गोमूत्राला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे . कोणतेही धार्मिक कार्यक्रम करताना मग तो शुभ असो अशुभ असो गोमूत्र वापरले जाते. सर्वात पहिल्यांदा गोमूत्र संपूर्ण वास्तु मध्ये शिंपडले जाते.त्यानंतर विधी सुरू केला जातो.गोमूत्र मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदातील अनेक औषधांमध्ये याचा वापर केला जातो.
गोमूत्र व पाणी यांचे मिश्रण करून ते घरामध्ये ,
व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडले तर वास्तु,मध्ये पवित्रता येते,शुद्धता निर्माण होते.
गोमूत्र, पाणी व कापूर यांचे मिश्रण करून ते घरामध्ये वास्तुमध्ये शिंपडले तर
शारीरिक त्रास ,आजारपण यांपासून मुक्तता मिळते.
गोमूत्र पाणी व हळद यांचे मिश्रण करून ते शिंपडले तर आर्थिक समस्या कमी होतात.
घरामध्ये, व्यवसायमध्ये प्रगती होते.
गोमूत्र व मीठ यांचे मिश्रण करून ते घरामध्ये ,
व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडले तर वास्तुमध्ये असलेली नकारात्मक शक्तिचा प्रभाव नष्ट होतो.
गोमूत्राचे असे अनेक फायदे आहेत.
गोमूत्र ,पाणी ,हळद ,मीठ व कापूर यांचे एकत्रित मिश्रण करून दर अमावस्या ,पोर्णिमेला किंवा दररोज आपल्या घरामध्ये ,वास्तुमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडले तर त्याचे अनेक लाभ होऊ शकतात.